Sunday, 31 December 2017

शुभेच्छा..नवीन वर्षाच्या...

📌📌

नमस्कार...
माझ्या सर्व मित्र परिवाराला...!

            २०१७ हे वर्ष कसे गेले..यावर अनेकांनी आपल्या फेसबुक / व्हाट्स अपच्या माध्यमातून आपल्या भावना विषद करत पोस्ट केल्या...कुणी नवीन वर्षाचे संकल्प केलेत तर कुणी मागील वर्षात घडलेल्या आठवणींना उजाळा देत..नवीन वर्षाचे सर्वत्र जल्लोषात स्वागत करीत आहे..येणाऱ्या नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला मनात एक विचार आला कि आपणही २०१७ हे वर्ष आपल्याला कसं वाटलं याविषयी आपले विचार आपल्या मित्रांकडे व्यक्त करावेत थोडासा संवाद साधावा म्हणून केलेला हा शब्द प्रपंच..
         मित्रांनो उगवलेला प्रत्येक दिवस हा मावळणारच असतो..त्याचप्रमाणे नवीन वर्ष सुरु झालं की ते देखील संपणारच यात काही शंकाच नाही..म्हणजे वर्ष संपलं यात विशेष काहीच नाही..येणारा प्रत्येक दिवस हा आपल्या आयुष्यातील शेवटचाच दिवस आहे..असे समजून मी मागील प्रत्येक दिवस हा एन्जॉय ( साजरा ) करतोय..आणि पुढील २०१८ या नवीन वर्षातही तेच करणार आहे..प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही  सुख दुःख व इतर अनेक घटना घडत असतात..अर्थात सरळ रस्त्याला असलेले वळण व चढ उतार येतात त्या प्रमाणे माणसाच्या आयुष्यातही असे काही प्रसंग येत असतात..सुखाचे अनेक प्रसंग मागील वर्षी ( २०१७ ) माझ्या नशिबी आले..तसेच काही प्रसंग माझ्याही आयुष्यात आले..कधी गंभीर स्वरूपाचे तर कधी थोडेसे सॉफ्ट ( हलकेसे ) देखील..या प्रसंगात माझ्या कुटुंबियांनी नातेवाईकांनी, माझ्या सर्व जिवलग मित्र परिवाराने व माझ्यावर प्रेम करणाऱ्या ज्ञात अज्ञात व्यक्तींनी मोठी साथ दिली..जिथे साक्षात मृत्यू माझ्या समोर येऊन दाखल झाला आहे असे मला वाटत असतांना.." तुला काहीच झाले नाही " असे माझ्या मित्रांचे बोल मला त्या मृत्यूच्या दारातून परत घेऊन आले..अचानक झालेल्या या घटनेने मी ही गोंधळलेलो होतो..काय होतंय किंवा काय झालंय हे मलाही समजत नव्हतं..आजही मी तो विचार करायला लागलो कि तो घडलेला प्रसंग मला आठवतो..व मी स्तब्ध होतो..प्रसंग कोणताही असो त्या प्रसंगाला सामोरे जाणारा मी या प्रसंगाला मात्र घाबरलो...खूप मोठी हिम्मत माझ्यात होती..पण आता मात्र ती हिम्मत जरा कमी झालेली मला वाटते.. असो.. यापलीकडे मागील ( २०१७ ) या वर्षात खूप काही गमावलं अथवा कमावलं असं झालेलं नाही..मित्र परिवाराची संख्या मोठी कमावली आजही ती वाढतच आहे..खूप काही अनुभव मिळाले..त्यात अनेक गोष्टी शिकायला देखील मिळाल्या..पत्रकारिता करतांना अनेक अनुभव आले...पुरस्कारही मागील वर्षी पदरात पडला..नावलौकिक मिळवतांना अनेकांनी कौतुकाची थाप पाठीवर दिली..सामाजिक कार्यात स्वताला गुंतवून घेतलं..परिवाराची हि मोठी साथ यात मिळत असते..अजूनही खूप काही करायचे आहे..या सर्व घडामोडीत दैनंदिन जीवन जगत असतांना कुणाच्या भावना माझ्याकडून दुखावल्या गेल्या नाही..ज्यांच्या म्हणून दुखावल्या गेल्या असतील त्यांनी मला मोठ्या मनाने माफ केलं..येणाऱ्या नवीन वर्षात खूप काही संकल्प न करता " एक माणूस " म्हणून जसं आजपर्यंत जगत आलोय तेच पुढील काळातही " एक माणूस " म्हणूनच मला जगायचं आहे..प्रत्येक दिवस हा नवीन दिवस व नवीन वर्ष म्हणून जगायचं आहे..येणाऱ्या प्रत्येक दिवसागणिक आनंद मिळवायचा आहे..आणि महत्वाचं म्हणजे आजचा दिवस हा माझ्या आयुष्यतील शेवटचा दिवस म्हणून मी जगणार आहे..' लाईफ एन्जॉय ' करणार आहे..हाच संकल्प मी आजपासून केलेला आहे..पुनश्च एकदा माझ्या सर्व मित्र परिवाराला हे नवीन वर्ष सुख - समृद्धीचे व भरभराटीचे जावो..येणाऱ्या  ( २०१८ ) या वर्षात आपल्या सर्वांच्या हातून आई - वडिलांची सेवा,समाजसेवा व देशसेवा घडो..ह्याच नवीन वर्षाच्या शुभेच्छा...

- संदीप जेजुरकर, नांदगाव
  

नूतन वर्षाभिनंदन...!

📌📌

नमस्कार...
माझ्या सर्व मित्र परिवाराला...!

            २०१७ हे वर्ष कसे गेले..यावर अनेकांनी आपल्या फेसबुक / व्हाट्स अपच्या माध्यमातून आपल्या भावना विषद करत पोस्ट केल्या...कुणी नवीन वर्षाचे संकल्प केलेत तर कुणी मागील वर्षात घडलेल्या आठवणींना उजाळा देत..नवीन वर्षाचे सर्वत्र जल्लोषात स्वागत करीत आहे..येणाऱ्या नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला मनात एक विचार आला कि आपणही २०१७ हे वर्ष आपल्याला कसं वाटलं याविषयी आपले विचार आपल्या मित्रांकडे व्यक्त करावेत थोडासा संवाद साधावा म्हणून केलेला हा शब्द प्रपंच..मित्रांनो उगवलेला प्रत्येक दिवस हा मावळणारच असतो..त्याचप्रमाणे नवीन वर्ष सुरु झालं की ते देखील संपणारच यात काही शंकाच नाही..म्हणजे वर्ष संपलं यात विशेष काहीच नाही..येणारा प्रत्येक दिवस हा आपल्या आयुष्यातील शेवटचाच दिवस आहे..असे समजून मी मागील प्रत्येक दिवस हा एन्जॉय ( साजरा ) करतोय..आणि पुढील २०१८ या नवीन वर्षातही तेच करणार आहे..प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही  सुख दुःख व इतर अनेक घटना घडत असतात..अर्थात सरळ रस्त्याला असलेले वळण व चढ उतार येतात त्या प्रमाणे माणसाच्या आयुष्यातही असे काही प्रसंग येत असतात..सुखाचे अनेक प्रसंग मागील वर्षी ( २०१७ ) माझ्या नशिबी आले..तसेच काही प्रसंग माझ्याही आयुष्यात आले..कधी गंभीर स्वरूपाचे तर कधी थोडेसे सॉफ्ट ( हलकेसे ) देखील..या प्रसंगात माझ्या कुटुंबियांनी नातेवाईकांनी, माझ्या सर्व जिवलग मित्र परिवाराने व माझ्यावर प्रेम करणाऱ्या ज्ञात अज्ञात व्यक्तींनी मोठी साथ दिली..जिथे साक्षात मृत्यू माझ्या समोर येऊन दाखल झाला आहे असे मला वाटत असतांना.." तुला काहीच झाले नाही " असे माझ्या मित्रांचे बोल मला त्या मृत्यूच्या दारातून परत घेऊन आले..अचानक झालेल्या या घटनेने मी ही गोंधळलेलो होतो..काय होतंय किंवा काय झालंय हे मलाही समजत नव्हतं..आजही मी तो विचार करायला लागलो कि तो घडलेला प्रसंग मला आठवतो..व मी स्तब्ध होतो..प्रसंग कोणताही असो त्या प्रसंगाला सामोरे जाणारा मी या प्रसंगाला मात्र घाबरलो...खूप मोठी हिम्मत माझ्यात होती..पण आता मात्र ती हिम्मत जरा कमी झालेली मला वाटते.. असो.. यापलीकडे मागील ( २०१७ ) या वर्षात खूप काही गमावलं अथवा कमावलं असं झालेलं नाही..मित्र परिवाराची संख्या मोठी कमावली आजही ती वाढतच आहे..खूप काही अनुभव मिळाले..त्यात अनेक गोष्टी शिकायला देखील मिळाल्या..पत्रकारिता करतांना अनेक अनुभव आले...पुरस्कारही मागील वर्षी पदरात पडला..नावलौकिक मिळवतांना अनेकांनी कौतुकाची थाप पाठीवर दिली..सामाजिक कार्यात स्वताला गुंतवून घेतलं..परिवाराची हि मोठी साथ यात मिळत असते..अजूनही खूप काही करायचे आहे..या सर्व घडामोडीत दैनंदिन जीवन जगत असतांना कुणाच्या भावना माझ्याकडून दुखावल्या गेल्या नाही..ज्यांच्या म्हणून दुखावल्या गेल्या असतील त्यांनी मला मोठ्या मनाने माफ केलं..येणाऱ्या नवीन वर्षात खूप काही संकल्प न करता " एक माणूस " म्हणून जसं आजपर्यंत जगत आलोय तेच पुढील काळातही " एक माणूस " म्हणूनच मला जगायचं आहे..प्रत्येक दिवस हा नवीन दिवस व नवीन वर्ष म्हणून जगायचं आहे..येणाऱ्या प्रत्येक दिवसागणिक आनंद मिळवायचा आहे..आणि महत्वाचं म्हणजे आजचा दिवस हा माझ्या आयुष्यतील शेवटचा दिवस म्हणून मी जगणार आहे..' लाईफ एन्जॉय ' करणार आहे..हाच संकल्प मी आजपासून केलेला आहे..पुनश्च एकदा माझ्या सर्व मित्र परिवाराला हे नवीन वर्ष सुख - समृद्धीचे व भरभराटीचे जावो..येणाऱ्या  ( २०१८ ) या वर्षात आपल्या सर्वांच्या हातून आई - वडिलांची सेवा,समाजसेवा व देशसेवा घडो..ह्याच नवीन वर्षाच्या शुभेच्छा...

- संदीप जेजुरकर, नांदगाव 
  

Saturday, 19 August 2017

...नांदगावकरांचा अखेरचा प्रवासही सुखकर नाही.

...नांदगावकरांचा अखेरचा प्रवासही सुखकर नाही.

नांदगाव : संदीप जेजुरकर

    '' इतकेच मला जातांना सरणावर कळले होते मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते...'' या कवी सुरेश भटांच्या कवितेतून माणसाचे जिवन खर तर खूपच खडतर आहे..मृत्यूनंतरच त्यातून सुटका होते याचा प्रत्यय येतो.. मात्र माणसाच्या मृत्युनंतरही सुटका नशिबी नसल्याचा प्रत्यय सध्या नगरपरिषद आरोग्य विभागाच्या अक्षम्य अशा दुर्लक्षामुळे नांदगावकरांना येत आहे.." काल ( दि.१६ ) जेष्ठ पत्रकार तथा गणेश न्यूज एजन्सीचे संचालक गजानन ( बापू ) आहेर यांच्या अंत्यविधी प्रसंगी अनुभवायास मिळाले..स्मशानभूमीत वीजपुरवठा नसल्याने  गडद असलेल्या अंधारात अंत्यविधी करण्याची वेळ आहेर कुटुंबियावर आली..मोबाईलच्या फ्लॅश लाईटमध्ये अंत्यविधी उरकावा लागला.. अंत्यविधीसाठी आलेल्या अनेकांना ते खटकले सुद्धा.. अंत्यविधीप्रसंगी गेलेल्या व्यक्तीच्या चांगल्या वाईट गुणांची चर्चा करत स्मशानभूमीत निरोप दिला जातो. मात्र नांदगावच्या स्मशानभूमीची दुरावस्थेची चर्चा करत यावेळी अंत्यदर्शन करण्यात आले..वेळोवेळी समशानभूमीची स्वच्छता आवश्यक असते मात्र स्वच्छतेचा दूरदूरपर्यंत लवलेशही इथेही बघायला मिळाला नाही..अंत्यदर्शनाप्रसंगी बसण्यासाठी उभारण्यात आलेल्या शेडमध्ये मोठमोठाले गवत उगवलेले आहे.बसण्यासाठी कमी मात्र गवताने मोठी जागा तेथे व्यापलेली आहे..परिणामी या गवतामुळे डासांचा मोठा प्रादुर्भाव स्मशानाभूमीत जाणवला.. या डासांच्या त्रासामुळे अंत्यदर्शनासाठी जमलेल्या शोकाकुल जनतेची चुळबुळ सारं काही अलबेल नसल्याचे सांगत होती..मृतदेहाला अग्नी डाग देण्यापूर्वी लाकडे रचण्यासाठी कठडे नाही. पाणी योजना तिथे राबविलेली नसल्याने अंत्यविधी प्रसंगी हातपंपावरील पाण्याचा वापर करावा लागतो.उन्हाळ्यात या हातपंपास पाणी नसल्याने देखील मोठी गैरसोय होते. कायमस्वरुपी वीज पुरवठा नसल्याने दिवाबत्तीची सोय नाही.अशा अनेक नागरी सुविधांचा अभाव या स्मशानाभूमीत जाणवतो. अंत्यसंस्कारासाठी  जाणाऱ्या रस्त्यावरील विवेक हॉस्पिटल मागील शाकंबरी नदीवरील पुलाची झालेली दुरावस्था देखील नसल्याचे अधोरेखित करते.नगरपरिषदेच्या विकास आराखड्यात स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील शाकंबरी नदीवरील पुलाच्या कामाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविलेले आहेत.मात्र शासन स्तरावरून निधीची मंजुरी नसल्याने पुलाचे हे काम रखडले असल्याचे समजले..दरम्यान मरणानंतरही मृदेहाला मरणासन्न अवस्था सहन करावी लागत असल्याने स्मशानभूमी दुरावस्थेकडे नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाने लक्ष देण्याची गरज असल्याची मागणी नागरिकांनी केली आहे. 

भोलेनगर स्मशानभूमीची दुरावस्था  -

शहरातील भोलेनगर येथील दुसऱ्या स्मशानभूमीची अवस्था देखील अशीच आहे.. अंत्यविधी सुरु असतांना छताचा काही भाग कोसळण्याचे प्रकार देखील भोलेनगर येथील स्मशानभूमीत घडले आहे. आजही स्मशानभूमीच्या छताला तडे गेले असल्याने छत कोसळण्याची शक्यता तिथे आहे. या स्मशानभूमीच्या कामास मध्यंतरी सुरुवात झाली होती खरी मात्र सध्या हे काम थांबलेले आहे..वेळेत काम न केल्याने संबंधित ठेकेदाराला परिषदेकडून नोटीस बजावल्याचे देखील समजते.       

स्मशानभूमीतील मरण यातना - 

अंत्यसंस्कारप्रसंगी ठेवण्यात येणाऱ्या मृतदेहास संरक्षण कठडे देखील नाही..

* स्मशानभूमीत कायमस्वरुपी पाण्याची व्यवस्था नाही..हातपंप आहे मात्र उन्हाळ्यात त्यास पाणी नाही..  

* स्मशानभूमीत असलेल्या शौचालयाची दुरावस्था मोठे गवत त्यात वाढलेले आहे.. 

* अंत्यसंस्कारानंतर उरलेली रक्षा टाकण्यास जागा नसल्याने बाजूला कुठेतरी ती टाकली जाते.

* स्मशानभूमीतील कचरा ( तिरडीचे बांबू ,कपडे ) तिथेच बाजूला टाकला जात असल्याने मोठी अस्वच्छता..            



Friday, 18 August 2017

जागतिक छयाचित्रकार दिन...

आज जागतिक छायाचित्रकार दिन...

     छायाचित्र दिनाच्या पार्श्वभूमीवर काल भटकंती करत असतांना एका छोट्याशा बोरीच्या झाडावर एक घरटे आढळले..नेहमीची सखोल चौकशी करण्याची सवय व घरट्यात काय आहे हे पाहण्याची औत्सुकता लागल्यानंतर..त्यात काय आहे हे बघण्यासाठी मोबाईल हातात घेवून पुढे सरसावलो असता त्यात छान असे एका पक्षाचे ३ अंडे दिसले...नेहमीप्रमाणे वेगळे काहीतरी टिपण्याची सवय असल्याने लगेचच मोबाईल क्लीक करून या घरट्याला व घरट्यातील अंड्यांना कैद केले.

- संदीप जेजुरकर,नांदगाव

Wednesday, 16 August 2017

खेळ कुणाला दैवाचा कळला..

खेळ कुणाला दैवाचा कळला...

        " ज्या वेळेस मी ह्या जगाचा निरोप घेईल त्या वेळेस माझ्या मुळे माझा वृत्तपत्र वाचक अडून राहणार नाही.." हे बापूंचे गमतीचे ठरलेले वाक्य..पण हे वाक्य खरे ठरवीत  ( दि.१६ ऑगस्ट ) वृत्तपत्रांना सुट्टी असलेल्या दिवशीच या जगाचा  गजानन ( बापू ) आहेर यांनी निरोप घेतला..वृत्तपत्र व्यवसायाशी त्यांची जुळलेली नाळ किती घट्ट होती यातून हे स्पष्ट होते..
           गणेश न्यूज एजन्सीचे संचालक तथा जेष्ठ पत्रकार गजानन ( बापू ) आहेर यांचे काल ( दि.१६ ) ऑगस्ट रोजी पुणे येथे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले..बापूंची exit मनाला काहीशी चटका लावून गेली..काल संपूर्ण दिवस त्या कुटुंबियांच्या अगदी जवळ असतांना त्यांना झालेले दुःख पाहून मन हेलावले..सकाळी 'बापू' गेल्याची बातमी समजली.. थोडा वेळ विश्वासच बसेना.. मात्र खात्री झाल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून निधनाची बातमी इतरत्र कळवली.. तेव्हापासून बापूंची विचारणा करणारे असंख्य कॉल माझ्याकडे सुरु झाले..ते सायंकाळी अंत्ययात्रा निघेपर्यंत सुरूच होते..नातेवाईक,मोठा मित्र परिवार व आपल्या वृत्तपत्र एजन्सी व्यवसायातून वाढवलेले संबंध असा सर्वांचा ओघ दिवसभर बापूंच्या घरी सुरूच होता..बापूंच्या सहवासातील अनेक आठवणी त्यांनी विशद केल्या..पत्रकार संजीव धामणे, पत्रकार भास्कर कदम यांच्या डोळ्यातील क्षणा क्षणाला ओघळणारे अश्रू तर सारं काही दुःख सांगून जात होते..तर रात्री उशिरा देखील अंत्ययात्रेत उपस्थित असलेला जनसागर त्यांच्या चांगुलपणाची जाणीव करून देत होता..अचानकपणे बापूंच्या जाण्याने संपूर्ण नांदगावकरांवर या दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे...
        अतिशय विनोदी स्वभाव असलेले मनमिळावू नेहमीच हसतमुख असणाऱ्या बापूंना..
भावपूर्ण श्रद्धांजली...!

- संदीप जेजुरकर,नांदगाव 

Friday, 11 August 2017

अशी झाली आमची ब्रम्हगिरी यात्रा...

...अशी झाली आमची ब्रम्हगिरी यात्रा.

- संदीप जेजुरकर,नांदगाव

     ब्रम्हगिरी प्रदक्षिणा पूर्ण करायची की ब्रम्हगिरी पर्वत पादाक्रांत करायचा या विवंचनेत असतांनाच सन २००० ते २०१५ या कार्यकाळात सलग १५ वेळा ब्रम्हगिरी प्रदक्षिणा ( फेरी ) पूर्ण केल्याने यंदा ब्रम्हगिरी पर्वत गाठायचा असं ध्येय निश्चित करून निघालो..आद्य ज्योतिर्लिंग असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शन घेऊन कुशावर्त कुंडावर नमस्कार करून स्वारी 'ब्रम्हगिरी' च्या दिशेने निघाली..ब्रम्हगिरी पर्वतावर चढाई करण्यास ज्या ठिकाणावरून सुरुवात होते ते महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाच्या ' 'संस्कृती रिसॉर्ट' येथे मस्त वाफाळलेल्या चहाचा आस्वाद घेत आम्ही सकाळी ९:१५ वा.ब्रम्हगिरीच्या दिशेने निघालो..सुरुवातीस थोडासा सिमेंट काँक्रीटचा रस्ता असल्याने अगदी आनंदात चालत होतो.. इतक्यात आमच्या गावाकडील काही मंडळी भेटली..'जय भोले'चा गजर करत माझ्याकडे असलेल्या कॅमेऱ्यात सर्वांचा एकत्रित फोटो काढत पुढे निघालो..पुढे पुढे सरकत असतांना वन विभागाच्या हद्दीला सुरुवात झाली..सगळीकडे हिरवेगार असे कधीही न पाहिलेले वेगवेगळे वृक्ष दिसू लागले.वनविभागाची माहिती देणारेे सूचना  फलक त्याच बरोबर 'हिरव्या रंगाची झाडी घनदाट सांग पांथस्ता दिसतो कसा ब्रम्हगिरीचा घाट.' , 'जागे व्हा कोमजते आहे धरणी माय..दुष्काळी क्षेत्र पसरवते आहे आपलेच पाय..' ,' प्रदूषणावर तोडगा काय..वनसंपत्ती हाच उपाय..' हे वन संपत्ती जोपासा असा संदेश देणारे घोषवाक्ये व वन्यप्राणी व विविध पक्षांची माहिती देणारे फलक ब्रम्हगिरी पर्वत सर करणाऱ्या भाविक व पर्यटकांचे लक्ष वेधून घेत होते..निसर्ग सौंदर्य डोळ्यात साठवत तसेच वनसंपतीची जपवणूक करणारे फलक आनंदाने वाचत पुढची वाटचाल सुरु झाली..ब्रम्हगिरी ३.६ कि.मी. असा डाव्या बाजूला असलेला फलक नजरेस पडला आणि आता एवढं अंतर आपल्याला कापायचं आहे असा विचार करून थोडीशी विश्रांती घेत पुन्हा पुढे पाऊल टाकत निघालो..रस्ता हळू हळू उंच व्हायला लागल्याने आता मात्र ब्रम्हगीरीची चढाई सुरु झाली याचा अंदाज यायला लागला..आमच्या सारखे अनेक भाविक व पर्यटक ब्रम्हगिरी पर्वत सर करत होते त्यात काही कुटुंब तर काही विद्यार्थ्यांच्या सहली एन्जॉय करत निघाल्या होत्या..अधून मधून निसर्ग सौंदर्य खुलविणारे लहान धबधबे दिसायला लागले.मग काय कॅमेऱ्यात व मोबाईल मध्ये धबधब्याचे क्षण कैद केले आणि पुढे निघालो..दगडात कोरलेल्या उंच उंच पायऱ्यांना आता सुरुवात झाली होती..थोडंसं अजून पुढे चालत गेल्या नंतर 'मुक्ताई मंदीर' लागले त्यात दर्शन घेवून पुन्हा पुढे चालू लागलो.दगडात कोरलेलं हनुमान जी..तसेच अनेक देवदेवतांच्या मुर्त्या न्याहाळत पुढे सरकत होतो..याच दरम्यान अनेक छोटे छोटे व्यावसायिक निंबू शरबत, काकडी,चहा बिस्कीट आदींची दुकाने थाटून येणाऱ्या भाविकांना आस्वाद घेण्याचा आग्रह धरत होते..थोडंसं अजून पुुढे काही अंतर चालून गेल्यानंतर उंच अशा डोंगरातील दगडांमध्ये कोरलेल्या पायऱ्या सुरु झाल्या..अतिशय कमी अंतरात तयार केलेल्या या पायऱ्यांमध्ये भाविकांची गर्दी होऊ लागली..ब्रम्हगिरी सर करतांना आता मात्र थकवा जाणवू लागला..तोच पावसाच्या संततधार अशा शिडकाव्याला सुरुवात झाली..मनाला हवाहवासा वाटणाऱ्या शिडकाव्याने व भाविकांनी बम बम भोलेचा आसमंत गाजवणारा गजर केल्याने आलेला थकवा दूर पळून गेला..वानर राजाची स्वारी देखील याच ठिकाणी दाखल झाली..कुणी बिस्कीट तर कुणी चणे फुटाणे,शेंगदाणे या वानरांना देत पुढे निघालो..ज्यांनी काहीच दिले नाही त्यांच्या पिशव्या हिसकावून घेत इथे आपलीच दादागिरी चालत असल्याचा प्रत्यय या वानर राजांनी गुर गुर करत दिला..दगडातील कोरलेल्या पायऱ्या पूर्ण करीत पुढे निघाल्यानंतर रस्त्याच्या कडेला एक टोळकं भेटलं.." भोले का प्रशाद है..एक कश मारलो..आगे जा के कठीणायी नहीं होंगी.." असे म्हणत 'जय भोले शंकर'चा नारा लावत जोरदार गांजाचा कश मारत धुराळा सोडला..थोडंसं पुढे चालून गेल्यानंतर ब्रम्हगिरीचा माथा दिसू लागला..उंच अशा माथ्यावर मंद असा वारा व धुक्यांनी चहू बाजूंनी व्यापलेला अथांग असा ब्रम्हगिरी पाहून मनाचे समाधान झाले..याच माथ्यावरून चहू बाजूंनी उंच उंच अशा डोंगररांगामध्ये संपूर्ण त्र्यंबकेश्वराचे मनोहारी वेढलेले रूप दिसू लागले..एकीकडे गोदावरी उगमस्थान व ब्रम्हगिरी मंदिर व दुसरीकडे भगवान शंकराने जटा आपटलेले स्थान असे दोन्ही मंदिरे दिसत असताना आम्ही मात्र गोदावरीच्या उगम स्थानाकडे जाण्याचा रस्ता धरला..निमुळता निसटता मार्ग असल्याने हळुवार पाय टाकत ब्रम्हगिरी मंदिराजवळ पोहोचलो..दर्शनासाठी मोठी गर्दी तिथे पाहायला मिळाली..गौतम ऋषीचे तपस्यास्थान असलेल्या ब्रम्हगिरी मंदिराचे मुख्य दर्शन घेतल्यानंतर बाजूलाच असलेले मूळगंगा ( गोदावरीचे उगमस्थान ) बघितले..छोट्या छोट्या दगडातील कोरीव मुर्त्या शिवलिंग व त्यावर थाटलेले पूजेचे आकर्षक असेलेले बिल्वपत्र,रंगीबेरंगी फुले मनमोहुन टाकत होते..याच ठिकाणी स्थानिक पुरोहित उगम स्थानातील जल घेऊन मूर्तीवर अभिषेक करून देत होते..वानर राजांची स्वारी इथेही दिमतीला हजरच होती..राजगिरा लाडू त्यांना देत तिथून त्यांचा निरोप घेत भगवान शंकराने आपटलेल्या जटा मंदिराकडे आगेकूच केली..डोंगराच्या कडे कडेने चालत असतांना सखोल असलेल्या दरीचे दर्शन होते..ब्रम्हगिरी प्रदक्षिणा मारत असलेल्या भाविकांचे विहंगम असे दृश्य या ठिकाणावरून मस्त दिसत होते..ते दृश्य कॅमेऱ्यात कैद करत पुढे निघालो..पुढील मार्गक्रमण करत असतांना डोंगरावर उगवलेली गवतांमधील छोटी छोटी सफेद रंगाची रानफुले खुणावत होती..तर मनातील सुप्त इच्छा पूर्ण व्हावी यासाठी छोटे छोटे दगड एकमेकांवर रचून मस्त अशी रास लावलेली बघायला मिळाली..ते बघून लहानपणी खेळत असलेल्या लंगूर ( लिंगोरच्या ) खेळाची आठवण झाली..तिथून पुढे निघाल्यानंतर भगवान शंकरांनी गोदावरी नदीचा प्रवाह बदलण्यासाठी जिथे जटा आपटल्या त्या शिवजटा मंदिरात जाऊन पोहोचलो..भगवान शंकराने टेकवलेले गुडघ्यांचे निशाण व डोक्यावरील आपटलेल्या जटा यांच्या खुणा यांचे दर्शन घेतले..हळू हळू आता पुन्हा परतीचा प्रवास सूरु झाला निसटता डोंगर असल्याने दगडांचा आधार घेत परतीच्या प्रवासाचे मार्गक्रमण सुरु झाले..पुढे जावून गंगा दरवाजाकडे देखील जायचे होते..पुन्हा एकदा गंंगा दरवाजाकडे जातांना दगडी पायऱ्या सुरु झाल्या थकवा तर खूप आला होता पण मनाची समजूत घालत अजून थोडंसं बाकी आहे असे म्हणत गंगा द्वार गाठले..फुलांचे हार विक्री करत असलेल्या माता भगिणींचा हार घेण्यासाठीचा आग्रह सुरु होता..तीन मुर्त्या आहेत १० रुपयात तीन हार घ्या..असा सूर त्यांनी लावला होता..गंगा द्वाराचे दर्शन घेवून डोंगराच्या कडेने थोडेसे पुढे वर चालल्या नंतर गोरक्ष गुफेचे दर्शन घेतले..आता खऱ्या अर्थाने परतीचा प्रवास सुरु झाला..पायऱ्या उतरत असतांना वाटेमध्ये पुन्हा श्रीराम कुंड व लक्ष्मण कुंडाचे दर्शन झाले..प्रभू रामचंद्र वनवासासाठी या स्थानावर आले असता आपल्या पितरांच्या श्राद्ध विधीसाठी औदूंबर वृक्षास बाण मारून गोदावरीचे पवित्र जल प्रवाहित केले होते.म्हणून या ठिकाणास राम तीर्थ म्हणून ओळखले जाते असा फलक या रामकुंडावर दर्शनी भागास लावलेला होता..रामकुंड व लक्ष्मण कुंड यांचे दर्शन घेवून मग आम्ही परतीचा प्रवास करत करत ब्रम्हगिरीच्या पायथ्याशी उतरलो..खूप सुंदर आणि मनसोक्त अशी भटकंती करतांना परमेश्वराचे दर्शन झाल्याने मन समाधान झाले..पुनश्च एकदा आपल्या मित्रांसोबत ब्रम्हगिरीवर येऊन मनसोक्त अशी भटकंती करावी अशी इच्छा मनी बाळगून आमची ब्रम्हगिरी यात्रा संपवली..

- संदिप जेजुरकर,नांदगाव ( नाशिक )

Monday, 31 July 2017

भरकटलेला...' कुदळ्या पक्षी '

नांदगाव : संदीप जेजुरकर
           काल ( दि.३१ ) श्री.बाळासाहेब गायकवाड,मोठी होळी नांदगाव ( नाशिक )  यांच्या घरावर जखमी अवस्थेत हा 'एक अनाहुत पक्षी' आढळला..अनेकदा त्याने उडण्याचा प्रयत्न केला मात्र त्याच्या पंखात उडण्याचं बळ नसल्याने तो उडू शकत नव्हता...वनविभागाच्या सूर्यवंशी दादा,सुनील खंदारे,गोपाल राठोड यांना बोलावून या पक्ष्याला त्यांच्या ताब्यात दिले..पक्षी प्रेमी व सर्प मित्र असलेल्या दिपक घोडेराव यांना बोलावून त्यांच्याकडून या पक्षाविषयी माहिती घेतली असता  त्यांनी त्या पक्षाची ओळख " कुदळ्या पक्षी "अशी सांगत त्यांचे खाद्य मासे किंवा पाण्यातील छोटे किटक असल्याचे सांगितले त्यानंतर पशु वैद्यकीय दवाखान्यात त्या पक्ष्यास उपचारासाठी नेल्यानंतर प्राथमिक तपासणीत त्याला कुठेही जखमा आढळल्या नाही परंतु अशक्तपणा आल्याने त्यास ग्लुकोज अथवा काहीतरी खायला द्यावे लागेल असे डॉ.सांगितले..लागलीच वनविभागाच्या सूर्यवंशी दादा व सुनील खंदारे,गोपाल राठोड यांनी त्यास खाद्य म्हणून मासे व ग्लुकोजची उपलब्धता करून देत वनविभागाच्या एका कार्यालयात सुरक्षितरीत्या ठेवत त्याचा मस्त पाहुणचार केला...

पक्षी प्रेमी व सर्प मित्र असलेल्या दिपक घोडेराव यांनी कुदळ्या पक्षी विषयी दिलेली माहिती...

कुठल्याही गावाच्या, शहराच्या बाहेरा तलावाजवळ,जिथे पाणथळीची जागा असेल तर तिथे हे हमखास आढळणार...आपल्याकडे आढळणारा 'काळा कुदळ्या' हा आकाराने मोठा असतो. त्याचा रंग जरी काळा असला तरी त्याच्या पंखांवर झळाळणाऱ्या रंगाची झाक असते. याच्या खांद्यावर पांढऱ्या रंगाची पिसे असतात तर डोक्यावर गडद लाल धब्बा असतो..कुदळ्यांच्या चोची लांब, खाली वाकलेल्या आणि एखाद्या कुदळीच्या पात्यासारख्या असतात. ह्या लांब आणि वक्राकार चोचीमुळे त्यांना चिखलाच्या आत दडलेले प्राणी, खेकडे, मासे पकडणे सोपे जाते..

- संदीप जेजुरकर
नांदगाव ( नाशिक )  


Tuesday, 21 March 2017

सत्तेसाठी कायपण...

...सत्तेसाठी कायपण

अभिनंदन...
सर्वच राजकीय पक्षांचे...

एखाद्या चांगल्या मुद्द्यासाठी ( शेतकऱ्यांच्या हितावह असलेले मुद्दे ) कधीही एकत्र न येणारे सर्व राजकीय पक्ष ' जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष ' निवडीच्या निमित्ताने सत्तेसाठी पक्षाचे ध्येय धोरणे,विचार व निवडणुकीत एकमेकांवर मोठी चिखलफेक करून जनतेची दिशाभूल करणारे 'धुरीण' एक अभद्र युती करून मात्र एकत्र झाले..
मजहब नही सिखाता आपस मैं बैर रखना..( जातीभेद वगळून पक्षभेद बाजूला करत ) कदाचीत या ओळीं या निमित्ताने अधोरेखित करत सत्तेसाठी का होईना मनोमिलन झालेले दिसतंय..

पुनश्च एकदा सर्वच राजकीय पक्षांचे मनापासून अभिनंदन...

संदीप जेजुरकर..
नांदगाव ( नाशिक )