Sunday, 12 September 2021

बाप्पा गणराया कुणालाही जास्तीच दुःख देवू नको देशील तर सुख आणि दुःख हे समांतरच दे...

📌📌

बाप्पा गणराया कुणालाही जास्तीच दुःख देवू नको देशील तर सुख आणि दुःख हे समांतरच दे...

           देवाने माणसाला जे काही आयुष्य दिलंय ना..ते सुख आणि समाधानाने समांतर असे भरलेले द्यायला हवे होते..खूप सारे लोक या धरतीवर जगतात पण त्यातील अनेकांच्या नशिबी दुःख हे खचून भरलेलं असतं.. सुख हा शब्दच त्यांच्या नशिबी नसतो..दुःख बाजूला सारून सुख शोधायला ही माणसं जेव्हा निघतात तेव्हा त्यांच्या वाट्याला अगदी क्षणिक सुख येतं..पण काही वेळातच दुःखाचा मोठा डोंगर त्यांच्या पुढ्यात उभा असतो..खरं तर परमेश्वर प्रत्येकाला काही काळ जगण्याची संधी देत असतो..या काळात सुख आणि दुःखाचा हिशोब परमेश्वर ठेवत असतो..मग हा हिशोब ठेवत असतांना कुणाच्या वाट्याला किती दुःख येतंय अथवा सुख येतंय हे त्या परमेश्वराच्या लक्षात येत नसेल का ? परमेश्वराची भक्ती केल्याने निरंतर समाधान मिळतं असंही म्हटलं जातं परंतु या जगात असे अनेक भक्त आहेत ज्यांनी अगदी परमेश्वर भक्तीमध्ये वाहून घेतलंय. पण अशा लोकांच्या वाट्याला सुद्धा मोठं दुःख आल्याचं आपण बघितलंय.. चांगली कामे करा, कामात परमेश्वराला शोधा, त्यातच सुख आहे असही आपण नेहमीच संतमंडळींकडून ऐकत असतो.पण चांगलं वागूनही शेवटी नशिबात दुःख हे येतचं..मग याला नेमकं काय म्हणायचं..आत्मा आणि परमात्मा यांचे मिलन झाले की माणूस सुखी होतो पण अनेकदा असं घडत की आत्म्याचे आणि परमात्म्याचे मिलन करता करता अनेकजण इहलोकी निघून जातात तरीदेखील त्यांचं मिलनही पूर्ण होत नाही आणि सुखही त्यांना शोधता येत नाही.. विश्वाच्या या सुख दुःखाच्या चक्रव्यूहात माणूस अडकून भरडला जातोय..निरंतर अशा सुखाच्या शोधात निघतांना दुःखाच्या खाईत तो लोटला जातोय..सुखाची नेमकी व्याख्याच इथं समजत नाहीये..खूप ताण तणाव वाढताय..अनेक विचार डोक्यात घोळताय..असो आयुष्यात येणाऱ्या सुख - दुःखाच्या लाटाच आपल्याला अनुभवसमृद्ध करतात असं म्हटलं जातं..पण अनुभव किती घ्यायचे यालाही काही मर्यादा ठरवून दिल्या पाहिजे..म्हणून आज गणरायला सांगणं आहे..बाप्पा गणराया कुणालाही जास्तीच दुःख देवू नको देशील तर सुख आणि दुःख हे समांतरच दे...🙏🏻


संदीप जेजुरकर, नांदगांव ( नाशिक )

No comments:

Post a Comment