Sandip Jejurkar
जिथं कमी तिथं आम्ही...!
Wednesday, 5 October 2022
माणूसपण ' हरवत 'चाललय..!
Tuesday, 5 July 2022
#ऋणानुबंधाच्या_अशा_ह्या_गाठी...
Sunday, 12 September 2021
बाप्पा गणराया कुणालाही जास्तीच दुःख देवू नको देशील तर सुख आणि दुःख हे समांतरच दे...
📌📌
बाप्पा गणराया कुणालाही जास्तीच दुःख देवू नको देशील तर सुख आणि दुःख हे समांतरच दे...
देवाने माणसाला जे काही आयुष्य दिलंय ना..ते सुख आणि समाधानाने समांतर असे भरलेले द्यायला हवे होते..खूप सारे लोक या धरतीवर जगतात पण त्यातील अनेकांच्या नशिबी दुःख हे खचून भरलेलं असतं.. सुख हा शब्दच त्यांच्या नशिबी नसतो..दुःख बाजूला सारून सुख शोधायला ही माणसं जेव्हा निघतात तेव्हा त्यांच्या वाट्याला अगदी क्षणिक सुख येतं..पण काही वेळातच दुःखाचा मोठा डोंगर त्यांच्या पुढ्यात उभा असतो..खरं तर परमेश्वर प्रत्येकाला काही काळ जगण्याची संधी देत असतो..या काळात सुख आणि दुःखाचा हिशोब परमेश्वर ठेवत असतो..मग हा हिशोब ठेवत असतांना कुणाच्या वाट्याला किती दुःख येतंय अथवा सुख येतंय हे त्या परमेश्वराच्या लक्षात येत नसेल का ? परमेश्वराची भक्ती केल्याने निरंतर समाधान मिळतं असंही म्हटलं जातं परंतु या जगात असे अनेक भक्त आहेत ज्यांनी अगदी परमेश्वर भक्तीमध्ये वाहून घेतलंय. पण अशा लोकांच्या वाट्याला सुद्धा मोठं दुःख आल्याचं आपण बघितलंय.. चांगली कामे करा, कामात परमेश्वराला शोधा, त्यातच सुख आहे असही आपण नेहमीच संतमंडळींकडून ऐकत असतो.पण चांगलं वागूनही शेवटी नशिबात दुःख हे येतचं..मग याला नेमकं काय म्हणायचं..आत्मा आणि परमात्मा यांचे मिलन झाले की माणूस सुखी होतो पण अनेकदा असं घडत की आत्म्याचे आणि परमात्म्याचे मिलन करता करता अनेकजण इहलोकी निघून जातात तरीदेखील त्यांचं मिलनही पूर्ण होत नाही आणि सुखही त्यांना शोधता येत नाही.. विश्वाच्या या सुख दुःखाच्या चक्रव्यूहात माणूस अडकून भरडला जातोय..निरंतर अशा सुखाच्या शोधात निघतांना दुःखाच्या खाईत तो लोटला जातोय..सुखाची नेमकी व्याख्याच इथं समजत नाहीये..खूप ताण तणाव वाढताय..अनेक विचार डोक्यात घोळताय..असो आयुष्यात येणाऱ्या सुख - दुःखाच्या लाटाच आपल्याला अनुभवसमृद्ध करतात असं म्हटलं जातं..पण अनुभव किती घ्यायचे यालाही काही मर्यादा ठरवून दिल्या पाहिजे..म्हणून आज गणरायला सांगणं आहे..बाप्पा गणराया कुणालाही जास्तीच दुःख देवू नको देशील तर सुख आणि दुःख हे समांतरच दे...🙏🏻
- संदीप जेजुरकर, नांदगांव ( नाशिक )
Sunday, 5 July 2020
...अशी झाली इंद्रायणी किल्ल्याची भटकंती
Saturday, 15 February 2020
...अन तो सैन्यात भरती झाला.. मोलमजुरी करणाऱ्या अविनाशची प्रेरणादायी कहाणी..
Friday, 20 December 2019
माणसाने आयुष्य जगायचं तरी कसं..!
रोजची_तीच_नित्याचीच_धावपळ..दोन पैसे कमवायचे.. आणि उदरनिर्वाह साधायचा..हा सगळा खेळ साधतांना माणूस आपलं जगणं विसरत चालला आहे..माणसाचं आयुष्य खूप छोटे आहे..धकाधकीच्या या जीवनात माणसाला समाधानाने जगता आलं पाहिजे..अशी भावना प्रत्येकाने जपावी असं मला वाटतं.. दिवसाची सुरुवात झाल्यानंतर..कामाची लगबग.. त्यातच आजच्या दिवसभरातील कामे काय करायची ती यादी डोळ्यापुढे येते.. कामाला सुरुवातही होते..पण काय होतं ना त्यातल्या पहिल्या दुसऱ्या कामालाच अडथळे यायला सुरुवात होते आणि पूर्ण दिवसाचं शेड्युल अक्षरशः चुकून जातं.. पहिल्या कामाचा पाठपुरावा करतांनाच चीड चीड सुरू होते.त्यातही आपल्या मनासारखे काम होत नाही.यामुळे काय होते तर पूर्ण दिवसाचीच पुरती वाट लागून जाते.मला जे हवंय जे घडायला पाहिजे होते तसं न घडल्याने मग कंटाळा यायला लागतो..हताश झालेले मन मग कुठंतरी विरंगुळा शोधायला लागतो..पण काय असतं ना हा विरंगुळा शोधल्यानंतरही माणसाच्या मनात मात्र तीच कामाची कालवा कालव सुरू असते..पुन्हा कामात मन रमवाव लागतं..हे सगळं असंच चालत राहिलं तर माणसाला ताण तणावाला सामोरं जावं लागत.. नको त्या माणसाशी मग भांडण होतात..मग आपण ज्याला आपण आपलं मानलेलं असतं,गृहीत धरलेलं अशा माणसाकडे हक्काने जातो आणि त्याच्या पुढ्यात आपल्या समस्या मांडतो व त्याच्याकडून मदत मिळेल अशी अपेक्षा बाळगतो पण होत उलटंच ज्या कामासाठी आपण त्या व्यक्तीकडे गेलेलो असतो तोच व्यक्ती आपल्या कामाला विरोध दर्शवत असतो..किंबहुना ते कामच करत नाही..मग तिथे आपला भ्रमनिरास होतो..त्यावेळेला मात्र आपल्याला खूप काही आठवायला लागतं.. जी व्यक्ती अथवा संस्थेला आपण यापूर्वी छोटीशी का होईना मदत केलेली असते किंवा आपल्या माध्यमातून ती झालेली असते.अशी थोडी तरी जाणीव त्या व्यक्तीने ठेवायला हवी होती असं वाटायला लागून मन आणखी दुःखी होत..दिवसभरात आलेले हे अनुभव सोबत घेऊन माणूस मग हताश होऊन आपल्या घराकडे वळतो.त्याला वाटतं की आता आपण आपल्या कुटुंबियांसमवेत रमलो म्हणजे दिवसभरात आलेले वाईट अनुभव बाजूला सारून कुटुंबियांत रमण्याचा प्रयत्न करू पण तेथेही त्याचं दुर्दैव्य आडवं येत..आज दिवसभरात आपल्या समोर आलेल्या अडचणी कुटुंबियांना सांगण्याच्या आतच कुटुंबियांच्या असलेल्या अपेक्षा व अडचणी पुढ्यात येतात..की ज्याचं उत्तर याच्याकडे नसतं..पुन्हा कुटुंबियांच्या रोषाला देखील सामोरे जावे लागतं.. हे असलं आयुष्य परमेश्वराने माणसाला दिलं आहे..असो या विषयाच्या शेवटी मी एवढंच म्हणेल की, क्षणभर सुखाचा शोध घेण्यासाठी व चांगले आयुष्य जगण्यासाठी निघालेल्या माणसाच्या पदरी मात्र नेहमी निराशा व दुःखाचाच डोंगर उभा ठाकलेला असतो मग माणसाने आयुष्य जगायचं तरी कसं..?
- संदीप जेजुरकर, नांदगांव ( नाशिक )
- 9423151089
Thursday, 7 November 2019
अहो...' सरकार ' कधी स्थापन करणार ?
विधानसभेच्या निवडणुका झाल्या..या निवडणुकीत भाजप - शिवसेना व मित्रपक्षांकडे महाराष्ट्रातील तमाम जनतेने कौल दिला..विजयी जल्लोषही करण्यात आला..पत्रकार परिषद घेऊन जनतेचे आभार मानण्यात आले..लवकरच महायुतीचं सरकार या राज्यात स्थापन होईल असं वाटतं असतांना मात्र आज १५ दिवस उलटून गेले , विधानसभेची मुदतही आज संपणार असतांना या राज्यात सरकार मात्र स्थापन झालेलं नाही..कारण काय तर लोकसभा निवडणुकीच्या आधी मित्रपक्षांच्या जागा ठरवून उरलेल्या जागेत भाजप आणि शिवसेना यांनी फिफ्टी - फिफ्टी जागा लढवायच्या..सत्ता आली तर सत्तेतील पदांमध्ये समसमान वाटप करायचे असा फॉर्म्युला ठरला होता..असे शिवसेनेकडून सांगत सरकार स्थापनेसाठी आपला प्रस्ताव भाजप पुढे शिवसेनेने ठेवला..मात्र शिवसेनेला गृहीत धरलेल्या भाजप कडून या बद्दल काहीच रिप्लाय आला नाही.उलट मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं काहीच ठरलेलं नव्हतं ' असं एका अनौपचारिक गप्पांमध्ये जाहीर केलं..त्यामुळे झालं काय तर शिवसेनेचा स्वाभिमान ' इगो ' दुखावला गेला..आणि शिवसेनेकडून मग सामनाचे संपादक खासदार संजय राऊत पुढे आले आणि त्यांनी थेट मुख्यमंत्री पदाची मागणी करत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचेसोर जे ठरलं त्यावर भाजपाने बोलावं असं ठणकावून सांगितलं..त्यानंतर श्री.राऊत यांनी जशी संधी मिळेल तस मित्रपक्ष भाजपाला चांगलेच धारेवर धरले..या दरम्यान, भाजपाची मात्र चांगलीच गोची झाली..भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, वनमंत्री सुधीर मुनगुंटीवार, जलसंपदामंत्री गिरीश महाजन आदींनी शिवसेनेचे चिमटे काढत वेगवेगळ्या प्रतिक्रिया देवून सरकार महायुतीचंच येणार हे सांगण्याचा प्रयत्न केला मात्र तो अयशस्वी ठरला..नुसता ठरला नव्हे तर तो संजय राऊत यांनी हाणून पाडला..राज्याच्या राजकारणात एकीकडे बलाढ्य असलेली भाजपा या संजय राऊतांपुढे मात्र हतबल झाली..नुसती हतबल झाली नाही तर सपशेल लोटांगण घालायला पण आता तयार आहे..जनतेच्या मते मागील पाच वर्षांपासून सुरु असलेली शिवसेनेचे झालेली फरफट व त्याचा बदला अवघ्या पंधरा दिवसाच्या काळातच संजय राऊत यांनी घेतला असं बोलल्या जात आहे..गगनाला हात लावणाऱ्या भाजपाला पुन्हा एकदा जमिनीवर आणण्याचे काम संजय राऊत यांनी केलं..कायमच शिवसेनेला या ना त्या कारणावरून ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्यांनीही भाजपाला ट्रोल करीत शिवसेनेच्या बाजूने मत मांडण्यास सुरुवात केली आणि शिवसेनेने दाखविलेल्या भूमिकेबद्दल कौतुक केले..आता सध्या काय सुरु आहे तर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा व किंगमेकर च्या भूमिकेत असलेले मा.शरद पवार यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष आहे..राजकारणाला कलाटणी देणारं व्यक्तिमत्व आणि काहीतरी धक्कादायकच निर्णय घेवून आपले बुद्धीचातुर्य अबाधित ठेवत राजकारणात आपणच ' पावरफुल ' असल्याचे दाखवून देणारे श्री.पवार हे याप्रसंगी काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागलेले आहे..असो
मी तर एवढंच म्हणेल राज्यातील शेतकरी जो यापूर्वी कोरड्या दुष्काळाने होरपळला होता तो यंदा मात्र ओल्या दुष्काळाने होरपळलेला आहे त्या शेतकरी राजाला लवकरात लवकर मदत व्हावी यासाठी व महाराष्ट्राच्या हितासाठी लवकर सरकार स्थापन व्हावं हीच तमाम महाराष्ट्रातील जनतेची इच्छा आहे..
या सगळ्या घडामोडीत मला असं वाटतं की,...
• भाजपने जर बहुमताचा दावा केला तर ते बहुमत सिद्ध करू शकणार नाही..मात्र शिवसेनेने बहुमताचा दावा केला तर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाहेरून पाठिंब्याने शिवसेना बहुमत सिद्ध करेल..
• जर भाजप - शिवसेना महायुतीचं सरकार स्थापन झालं आणि त्यात भाजपाच्या वाट्याला मुख्यमंत्रीपद दिलं तर त्या पदावर देवेंद्र फडणवीस नसतील...
• अडीच - अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घेतलं तर त्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री हा पहिले अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद सांभाळेल..
• चार महत्वाच्या खात्यांपैकी दोन खाते शिवसेनेकडे असतील..
• शिवसेना आणि राष्ट्रवादी मिळून राज्यात सरकार स्थापन होऊ शकत त्याला काँग्रेस बाहेरून पाठींबा देईल..
• सत्तेपासून भाजपाला दूर ठेवण्यासाठी वेळेप्रसंगी राष्ट्रवादीचे मुख्यमंत्री म्हणून मा.शरद पवार देखील बसू शकतात त्यास शिवसेना अटी शर्ती ठेवून पाठींबा देईल..
• राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार नाही..असंही मला वाटतं
ता.क. - राज्यातील घडामोडींवर लिहिण्याचा हा पहिलाच प्रसंग असल्याने आपल्या प्रतिक्रिया व सूचना अपेक्षित आहे..
- संदीप जेजुरकर,नांदगाव ( नाशिक )
- ९४२३१५१०८९