माणसाने_आयुष्य_जगायचं_तरी_कसं..!
रोजची_तीच_नित्याचीच_धावपळ..दोन पैसे कमवायचे.. आणि उदरनिर्वाह साधायचा..हा सगळा खेळ साधतांना माणूस आपलं जगणं विसरत चालला आहे..माणसाचं आयुष्य खूप छोटे आहे..धकाधकीच्या या जीवनात माणसाला समाधानाने जगता आलं पाहिजे..अशी भावना प्रत्येकाने जपावी असं मला वाटतं.. दिवसाची सुरुवात झाल्यानंतर..कामाची लगबग.. त्यातच आजच्या दिवसभरातील कामे काय करायची ती यादी डोळ्यापुढे येते.. कामाला सुरुवातही होते..पण काय होतं ना त्यातल्या पहिल्या दुसऱ्या कामालाच अडथळे यायला सुरुवात होते आणि पूर्ण दिवसाचं शेड्युल अक्षरशः चुकून जातं.. पहिल्या कामाचा पाठपुरावा करतांनाच चीड चीड सुरू होते.त्यातही आपल्या मनासारखे काम होत नाही.यामुळे काय होते तर पूर्ण दिवसाचीच पुरती वाट लागून जाते.मला जे हवंय जे घडायला पाहिजे होते तसं न घडल्याने मग कंटाळा यायला लागतो..हताश झालेले मन मग कुठंतरी विरंगुळा शोधायला लागतो..पण काय असतं ना हा विरंगुळा शोधल्यानंतरही माणसाच्या मनात मात्र तीच कामाची कालवा कालव सुरू असते..पुन्हा कामात मन रमवाव लागतं..हे सगळं असंच चालत राहिलं तर माणसाला ताण तणावाला सामोरं जावं लागत.. नको त्या माणसाशी मग भांडण होतात..मग आपण ज्याला आपण आपलं मानलेलं असतं,गृहीत धरलेलं अशा माणसाकडे हक्काने जातो आणि त्याच्या पुढ्यात आपल्या समस्या मांडतो व त्याच्याकडून मदत मिळेल अशी अपेक्षा बाळगतो पण होत उलटंच ज्या कामासाठी आपण त्या व्यक्तीकडे गेलेलो असतो तोच व्यक्ती आपल्या कामाला विरोध दर्शवत असतो..किंबहुना ते कामच करत नाही..मग तिथे आपला भ्रमनिरास होतो..त्यावेळेला मात्र आपल्याला खूप काही आठवायला लागतं.. जी व्यक्ती अथवा संस्थेला आपण यापूर्वी छोटीशी का होईना मदत केलेली असते किंवा आपल्या माध्यमातून ती झालेली असते.अशी थोडी तरी जाणीव त्या व्यक्तीने ठेवायला हवी होती असं वाटायला लागून मन आणखी दुःखी होत..दिवसभरात आलेले हे अनुभव सोबत घेऊन माणूस मग हताश होऊन आपल्या घराकडे वळतो.त्याला वाटतं की आता आपण आपल्या कुटुंबियांसमवेत रमलो म्हणजे दिवसभरात आलेले वाईट अनुभव बाजूला सारून कुटुंबियांत रमण्याचा प्रयत्न करू पण तेथेही त्याचं दुर्दैव्य आडवं येत..आज दिवसभरात आपल्या समोर आलेल्या अडचणी कुटुंबियांना सांगण्याच्या आतच कुटुंबियांच्या असलेल्या अपेक्षा व अडचणी पुढ्यात येतात..की ज्याचं उत्तर याच्याकडे नसतं..पुन्हा कुटुंबियांच्या रोषाला देखील सामोरे जावे लागतं.. हे असलं आयुष्य परमेश्वराने माणसाला दिलं आहे..असो या विषयाच्या शेवटी मी एवढंच म्हणेल की, क्षणभर सुखाचा शोध घेण्यासाठी व चांगले आयुष्य जगण्यासाठी निघालेल्या माणसाच्या पदरी मात्र नेहमी निराशा व दुःखाचाच डोंगर उभा ठाकलेला असतो मग माणसाने आयुष्य जगायचं तरी कसं..?
- संदीप जेजुरकर, नांदगांव ( नाशिक )
- 9423151089
रोजची_तीच_नित्याचीच_धावपळ..दोन पैसे कमवायचे.. आणि उदरनिर्वाह साधायचा..हा सगळा खेळ साधतांना माणूस आपलं जगणं विसरत चालला आहे..माणसाचं आयुष्य खूप छोटे आहे..धकाधकीच्या या जीवनात माणसाला समाधानाने जगता आलं पाहिजे..अशी भावना प्रत्येकाने जपावी असं मला वाटतं.. दिवसाची सुरुवात झाल्यानंतर..कामाची लगबग.. त्यातच आजच्या दिवसभरातील कामे काय करायची ती यादी डोळ्यापुढे येते.. कामाला सुरुवातही होते..पण काय होतं ना त्यातल्या पहिल्या दुसऱ्या कामालाच अडथळे यायला सुरुवात होते आणि पूर्ण दिवसाचं शेड्युल अक्षरशः चुकून जातं.. पहिल्या कामाचा पाठपुरावा करतांनाच चीड चीड सुरू होते.त्यातही आपल्या मनासारखे काम होत नाही.यामुळे काय होते तर पूर्ण दिवसाचीच पुरती वाट लागून जाते.मला जे हवंय जे घडायला पाहिजे होते तसं न घडल्याने मग कंटाळा यायला लागतो..हताश झालेले मन मग कुठंतरी विरंगुळा शोधायला लागतो..पण काय असतं ना हा विरंगुळा शोधल्यानंतरही माणसाच्या मनात मात्र तीच कामाची कालवा कालव सुरू असते..पुन्हा कामात मन रमवाव लागतं..हे सगळं असंच चालत राहिलं तर माणसाला ताण तणावाला सामोरं जावं लागत.. नको त्या माणसाशी मग भांडण होतात..मग आपण ज्याला आपण आपलं मानलेलं असतं,गृहीत धरलेलं अशा माणसाकडे हक्काने जातो आणि त्याच्या पुढ्यात आपल्या समस्या मांडतो व त्याच्याकडून मदत मिळेल अशी अपेक्षा बाळगतो पण होत उलटंच ज्या कामासाठी आपण त्या व्यक्तीकडे गेलेलो असतो तोच व्यक्ती आपल्या कामाला विरोध दर्शवत असतो..किंबहुना ते कामच करत नाही..मग तिथे आपला भ्रमनिरास होतो..त्यावेळेला मात्र आपल्याला खूप काही आठवायला लागतं.. जी व्यक्ती अथवा संस्थेला आपण यापूर्वी छोटीशी का होईना मदत केलेली असते किंवा आपल्या माध्यमातून ती झालेली असते.अशी थोडी तरी जाणीव त्या व्यक्तीने ठेवायला हवी होती असं वाटायला लागून मन आणखी दुःखी होत..दिवसभरात आलेले हे अनुभव सोबत घेऊन माणूस मग हताश होऊन आपल्या घराकडे वळतो.त्याला वाटतं की आता आपण आपल्या कुटुंबियांसमवेत रमलो म्हणजे दिवसभरात आलेले वाईट अनुभव बाजूला सारून कुटुंबियांत रमण्याचा प्रयत्न करू पण तेथेही त्याचं दुर्दैव्य आडवं येत..आज दिवसभरात आपल्या समोर आलेल्या अडचणी कुटुंबियांना सांगण्याच्या आतच कुटुंबियांच्या असलेल्या अपेक्षा व अडचणी पुढ्यात येतात..की ज्याचं उत्तर याच्याकडे नसतं..पुन्हा कुटुंबियांच्या रोषाला देखील सामोरे जावे लागतं.. हे असलं आयुष्य परमेश्वराने माणसाला दिलं आहे..असो या विषयाच्या शेवटी मी एवढंच म्हणेल की, क्षणभर सुखाचा शोध घेण्यासाठी व चांगले आयुष्य जगण्यासाठी निघालेल्या माणसाच्या पदरी मात्र नेहमी निराशा व दुःखाचाच डोंगर उभा ठाकलेला असतो मग माणसाने आयुष्य जगायचं तरी कसं..?
- संदीप जेजुरकर, नांदगांव ( नाशिक )
- 9423151089